आयुष्याचा प्रवास
कणाकणांनी जमविलेला संसार क्षणभरात विखरुनी जातो, उरी स्वप्न बाळगून माणूस स्वप्नांचे मनोरे आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर रचित जातो. आपले आपले म्हणता म्हणता भौतिक गोष्टींचा साठा करीत जातो, या पसा ऱ्यात स्वतःला मात्र तो स्वतःचे सर्वस्व हरवीत जातो. हे माझे ते माझे करत करत मोहजाळाचा गुंता वाढवीत जातो, उतरत्या आयुष्याच्या टप्प्यावर मात्र आपलेच जवळचे न सोबतीचा देह मात्र क्षणाक्षणाला आपली साथ मात्र सोडत जातो. ----शिरीषकुमार जाधव